मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षाणासाठी तरुणाची जलसमाधी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी केज तालुक्यातील एका तरुणाने पाली धरणात उडी मारून जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी घडली. पोलिसांना काठावर एक बॅग सापडली असून त्यात मोबाईलमध्ये त्याने आत्महत्येचे कारण रेकॉर्ड केले आहे.

संजय ज्ञानोबा ताकतोडे असे तरुणाचे नाव आहे.

मागील अनेक वर्षांपासून मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने व मोर्चे मातंग समाजाकडून काढण्यात आले. परंतु सरकारकडून याची दखल घेतली जात नाही. असा आरोप करत मंगळवारी संजय ताकतोडे याने या स्वतंत्र आंदोलनासाठी पाली धरणाजवळ पाण्यात उडी मारून जलसमाधी घेतली. त्यानंतर याची माहिती मिळाल्यावर बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेतली. पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. काठावर त्याची बॅग पोलिसांना सापडली असून त्यात त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचे कारण त्याने रेकॉर्ड करून ठेवले आहे.