तनुश्री प्रकरणावर बॉलिवूडमध्ये वादळ उठले आहे. तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. आता नाना पाटेकर या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र अखेरीस नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ‘जे दहा वर्षांपूर्वी बोललो तेच खरे आहे. जे सत्य आहे ते कायम सत्यच राहणार,’ असे नाना या पत्रकार परिषदेत म्हणाले. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीत केला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78336756-caeb-11e8-b680-cbb4b041b20d’]
नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. ‘तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली असून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाही. तसेच वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे,’ असं ते पुढे म्हणाले.
तनुश्रीची पोलिसांत तक्रार –
तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी लेखी तक्रार दाखल केली. नाना पाटेकर यांच्यासह कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील तक्रारीत उल्लेख आहे. तनुश्रीने नानांवर केलेल्या आरोपांवर अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी तनुश्रीची पाठराखण केली आहे. तर काहींनी हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे अशी तनुश्रीवर टीका केली.तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी लेखी तक्रार दाखल केली.
तनुश्री दत्ताचा आरोप –
[amazon_link asins=’B0784D7NFX,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9887e50-caeb-11e8-ae5a-db9a5795a3c9′]