पोलीसनामा ऑनलाइन टीम – समोसे, पाणीपुरी, कचोरी, मोमोज, बर्गर हे लोकांच्या आवडीचे पदार्थ आहेत. रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून हे पदार्थ खवय्ये मोठ्या चवीने खातात. परंतु, दिल्लीत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार या सर्व पदार्थांमध्ये मोमोज हा सर्वात वाईट पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोमोजची क्वालिटी आणि त्याबरोबर मिळणारी तिखट चटणी खाल्ल्याने आजारपण येऊ शकते. मोमोजमध्ये गरजेपेक्षा जास्त फिकल मॅटर वापरले जाते. त्यामुळे शरिराची हानी होऊ शकते.
असे निकृष्ट पदार्थ खाल्ल्याने विविध आजार होऊ शकतात. संशोधनानुसार मोमोज तयार करण्यासाठी ब्लिचिंग मैदा वापरतात. तसेच त्यात अनेक केमिकल्सचा वापरही होतो. त्यात मोनोसोडियम ग्लूटामेट असते. ते हाडांना कमकुवत करते. त्यामुळे नव्र्हस डिसऑर्डरची समस्या उद्भवू शकते. मोमोजमध्ये वापरली जाणारी पत्तागोबीही चांगली शिजवलेली नसते. चटणी खूपच तिखट असल्याने पाइल्सचा आजार होऊ शकतो. तर नॉनव्हेज मोमोजमध्ये खराब किंवा आधीच मेलेल्या चिकनचे फिलिंग केले जाते. अशा स्थितीत त्यात बॅसिलस सेरस, क्लॉस्ट्रीडियम परफ्रिगेंस, स्टेफिलोकोकस ऑरियस आणि साल्मोनेला बॅक्टेरिया तयार होतात.
फ्राइड किंवा फ्राइड फिलिंग पदार्थांचे ठरावीक वेळेनंतर विघटन होऊ लागते. त्यामुळे त्यात बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. तेलात तळलेले पदार्थ जास्तीत जास्त ६ ते ८ तासांनी खराब व्हायला सुरुवात होते. ते फ्रिजमध्ये ठेवले तर ते १२ तासांपर्यंत टिकते. या काळानंतर हे पदार्थ खाल्ले तर पोटात कळ येणे, टायफाइड, उलटी, जुलाब, अॅसिडिटी असे आजार होऊ शकतात.
स्ट्रीट फूडमध्ये खराब पाण्याचा वापर झाल्यास टाइफाइडचा धोका वाढतो. त्यामुळे आतड्यांना छिद्र पडू शकतात. म्हणजे आतडे फाटू शकतात. तर डिसेंट्रीमध्ये शौचेच्या वेळी रक्त पडते. शक्यतो स्ट्रीट फूड टाळावे. स्वच्छता असेल त्याच ठिकाणीच खावे. स्ट्रीट फूडमध्ये अनेकदा तेलाचा वापर केला जातो.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –