आंबे चोरण्यासाठी केला रखवालदाराचा खून; आरोपींना ठोकल्या बेड्या 

विरार : पोलीसनामा ऑनलाईन

उसगांव येथे लक्ष्मी फार्म हाऊसवर जंगी राजभर या रखवालदारचा मृतदेह काही दिवसांपूर्वी आढळून आला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी मंगळवारी चार आरोपींना अटक केल्यांनतर या हत्येचं गूढ उलगडले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विनोद महादू बसवंत, विलास यशवंत जाधव, राजेश काळूराम बसवंत आणि संतोष काळूराम पडवळे या चार आरोपींना अटक केली आहे.

29 मार्च रोजी चारही आरोपींनी आंबे चोरायचा प्लॅन केला होता. ठरल्याप्रमाणे ते रात्रीच्या वेळी आंबे चोरण्यासाठी आले असता रखवालदार राजभर यांनी त्यांच्या तोंडावर बॅटरी मारली. आपण पकडले जाऊ या भीतीपोटी आरोपींनी तेथील एक दगडी पाटा उचलून राखणदार राजभर यांच्या डोक्यात घालून त्यांची हत्या केली. हत्त्या केल्यानंतर चारही आरोपी फरार झाले होते.

1 एप्रिल रोजी राजभरचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.