खातेवाटपानंतर आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील आठवड्याभरापासून रखडलेले खातेवापट अखेर जाहीर झाले. मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले असून मंत्रिमंडळात समावेश असलेले युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे. खातेवाटप झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला आवडती खाती मिळाल्याने आनंदी असून सर्वांना सोबत घेऊ काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणला, मला पर्यावरण आणि पर्यटन अशी आवडती खाती मिळाली. याचा माला आनंद आहे. आता मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. माझ्या मते पर्यटनावर आपण संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था उभारु शकतो. सद्यस्थितीत महाराष्ट्रात पर्यटनवाढीस वाव आहे. गडकिल्ले, समुद्र किनारे यामुळे राज्यात पर्यटनात वाढ होऊ शकते.

जाहीर झालेल्या खातेवाटपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन तेसच विधी व न्याय ही खाती ठेवली आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री, शिवसेनेचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात महसूल तर अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधाकाम मंत्री असणार आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय खाते देण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/