अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला आहे. येत्या दोन आठवड्यात ही सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहीती खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाण पूलाच्या व अन्य राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून नगर शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे लक्ष वेधले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची वैयक्तिक भेट घेवून खा.डाॅ विखे यांनी नगर शहरातील उड्डाण पुलासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जमीनीच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली होती.
बुधवारी रक्षा भवन येथे शहरातील उड्डाण पुला बरोबरच नगर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा-सोलापूर या मार्गाचा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला. या तिन्ही मार्गाचे काम सरंक्षण विभागाच्या जमीनीच्या भूसंपादना अभावी रखडल्याचे खा.डाॅ.सुजय विखे यांनी निदर्शनास आणून दिले.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या संरक्षण विभागाच्या तसेच जमीन भूसंपादनाच्या विषयाशी संबधित असलेल्या अधिकाऱ्यांकडून माहीती जाणून घेतल्यानंतर या सर्व जमीनीच्या भूसंपादन विषयास मंजूरी दिली याची कार्यवाही दोन आठवड्यातच पूर्ण करण्याचे मंत्र्यानी सूचित केले असल्याचे खा.डाॅ.विखे यांनी सांगितले.
Visit : policenama.com
- पायी वेगाने चालण्याचे ‘हे’ आहेत तब्बल ३४ फायदे, वाचून व्हाल थक्क !
- मडक्यातील पाण्याचे ९ फायदे आणि फ्रिजच्या पाण्याचे ५ तोटे जाणून घ्या
- ‘सुपरफूड अॅवोकॅडो’! खाताना, खरेदी करताना, साठवताना ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- लठ्ठपणाच्या दुष्परिणामांचे ‘हे’ आहेत २ मुख्य प्रकार, जाणून घ्या
- तुम्ही लठ्ठ आहात का ? ‘या’ २ पद्धतीने ओळखा, नेहमी लक्षात ठेवा या ४ गोष्टी
- काविळ, दम्यावर कांदा गुणकारी ! ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे