अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड ‘कोरोना’च्या लढाईत झाल्या ‘यशस्वी’

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन – स्वतःचा जीव धोक्यात घालून अक्कलकोट च्या तहसीलदार अंजली मरोड काम करत असून कोरोना च्या लढाईत जीव धोक्यात घालून काम करत आहेत तर गावपातळीवरील समिती सेवेत त्या दिवस रात्र कार्यतत्पर राहिल्या आहेत,त्यामुळे च अक्कलकोट तालुक्यातील एकही गावांत कोरोनाचा शिरकाव अध्याप ही झाला नाही, याला कारण ही तसेच महत्वपूर्ण आहे. अक्कलकोट च्या तहसीलदार अंजली मरोड यांच्या कार्यतत्पर कामामुळे.

अक्कलकोट आज संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे की जिथे सुरवातीपासून आज पर्यत एकही कोरोना चा पेशंट मिळाला नाही. तहसीलदार अंजली मरोड यांच्या मुळे आज हे चांगले चित्र सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट मध्ये दिसत आहे.

तहसीलदार अंजली मरोड यांच्या नियंत्रणाखाली कोरोना नियंत्रण समिती ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. प्रत्येक गावागावांत त्या स्वतः भेटी देत फिरत असून कोरोना च्या लढाईत जे जे सरकारी खात्याचे लोक कार्यरत आहेत त्यांना भेटून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत आहेत, व त्यांना कसल्या अडचणी आहेत का ? याची माहिती घेत त्या पायाला भिंगरी बांधल्यासारखे रात्रंदिवस तालुक्यात फिरत आहेत, वरून जिल्हाधिकारी अथवा विभागीय आयुक्त यांचे आदेश व सूचना हे सर्व सांभाळून पुन्हा त्यांचे सकाळी सकाळी ऑफिस ला हजेरी लावणे, हा त्यांचा दिनक्रम आहे, गेल्या दोन महिन्यांपासून सतत सुरू असून गेल्या दोन महिन्यांत त्यांनी एकही रजा न घेता सतत 24 तास कार्यरत राहून तहसीलदार मरोड काम चालवत आहेत.

ओ वैनी….ओ काकू….घरात बसा ना….हे सर्व तुमच्यासाठीच तर चाललं आहे. असे खडे बोल त्या गावपातळीवर जाऊन त्या लोकांना ओरडून सांगत आहेत. कोरोना प्रतिबंधक समिती सोबत राहून त्या आपले कर्तव्य करत असून, कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना त्यांच्या हाती घेतल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती तहसीलदारामार्फत स्थापन आहे, केलेली आहे.

कोरोना प्रतिबंध समिती तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली काम सुरू केले आहे आणि सर्वच गावकऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे तर अक्कलकोट शंभर टक्के लॉकडा करण्याचा निर्धार तहसीलदार यांच्या निगराणी खाली कार्यरत समितीने केला आहे. शिवाय बाहेरगावाहून आलेल्यांना घरातच बसण्याची सूचना करून संपूर्ण गाव लॉकडाउन केल्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.

पुणे, मुंबई यांसारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. गावात आलेल्या या गावक-यांची नोंद घेण्यात आली असून, त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. त्याना अक्कलकोट तालुक्यातील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात पास देण्याची सोय करण्यात आली असून, रेड झोन च्या लोकांना अक्कलकोट मध्येच क्वांरंटाईन करण्यात येत आहे, तर ऑरेंज झोन च्या लोकांना आपापल्या गावपातळीवरील जि प शाळेत क्वांरंटाईन केले जात आहे, ग्रीन झोन च्या लोकांना त्यांच्या घरीच क्वांरंटाईन करण्यात येत आहे.शिवाय घराबाहेर पडू नका अशी सक्त ताकीद तहसीलदार स्वतः देत आहेत.

या कोरोना समितीतील सुपरवायझर, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, हे सर्व शासकीय कर्मचारी गावपातळीवर आतिशय काटेकोरपणे आपली सेवा बजावत असून, गावात सर्व कामे युद्धपातळीवर हाताळले जात असून, या समितीवर विभाग निहाय विस्तार अधिकारी, सुपरवायझर, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, यासारख्या अधिका-यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावावर नियंत्रण ठेवले आहे.

गावक-यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंध समिती प्रसंगी महत्त्वपूर्ण निर्णय घेतआहे, त्यात ग्रामस्थांनी वारंवार हात धुणे, शिंकताना व खोकताना तोंडाला रुमाल,व मास्क बांधणे, घरासमोर व दारासमोर साबण व पाण्याची बादली भरून ठेवणे, बाहेरून आल्यानंतर घरात जाण्यापूर्वी हात, पाय, तोंड साबणाने धुणे, गावात अनावश्यक फिरू नये, गावात घोळका करून बसू नये, आपापल्या घरात थांबावे, घराची व परिसराची रोज साफसफाई करावी, सर्दी-खोकला-ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांना भेटावे, गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी घरात थांबावे व कुटुंबातील व्यक्तीपासून दूर राहावे, भाजीपाला, किराणा, औषधे यांची योग्य दराने विक्री करावी, ग्राहकांनी वस्तू घेताना सामाजि…