…म्हणून चाहते करत आहे अक्षयला ट्रोल

मुंबई : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळ्यांवर कारवाई केली. या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा वातावरणात अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘केसरी’ चित्रपटातील गाण्याचे प्रमोशन केल्याने चाहते त्याच्यावर नाराज झाले असून अक्षयला ट्रोल केलं आहे.

गेल्या बुधवारी अक्षयच्या ‘केसरी’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘सानू केहंदी’ रिलीज झालं यागाण्याला अक्षय आणि निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर शेअर करत गाण्याचं प्रमोशन केलं होत. नेमकी अक्षयची हीच गोष्ट चाहत्यांना खटकली आणि त्यांनी अक्षयवर टीका करण्यास सुरवात केली.

देशात एकीकडे तणावाची परिस्थिती असताना, सीमेवर जवानांचे प्राण जात असताना तू तुझ्या चित्रपटाचं प्रमोशन काही दिवस पुढे ढकलू शकत नाही का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी अक्षयला विचारलाआहे. ‘आम्ही तुझे चाहते आहोत पण देशात असं वातावरण असताना फक्त आपला वैयक्तिक विचार करणं योग्य नाही,’ असंही एका युजरने लिहिलं आहे. त्यामुळे अक्षयने चित्रपटातील गाण्याचं प्रमोशन करून चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.

काही दिवसापूर्वी अक्षयच्या ‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला होता. हा चित्रपट शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे. चित्रपटातअक्षयसोबत परिणीती चोप्राही दिसणार आहे.