Andheri By Election | अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भाजप अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहे – बाळासाहेब थोरात
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा (Andheri By Election) मार्ग आता मोकळा झाला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. परंतु लटके यांचा महापालिकेतील नोकरीचा राजीनामा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आड येत होता. त्यामुळे शिवसेनेने महापालिका आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांच्यावर दबावाखाली काम करत असल्याचे आरोप करत, मुंबई उच्च न्यायलयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. न्यायलयाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा (Andheri By Election) मार्ग मोकळा झाला आहे.
यावर काँग्रेसचे नेते (Congress Leader) आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाष्य केले आहे. भाजपची (BJP) राजकारण करण्याची पद्धत कोणती आहे, हे कळत नाही. किती खालच्या पातळीवर जाऊन ते राजकारण करत आहेत. ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणात न्यायालयातून न्याय घ्यावा लागत आहे, यावरु सर्व स्पष्ट होत आहे, असे थोरात म्हणाले. लोकशाहीत हे प्रकार अभिप्रेक नाहीत. लोकाशाहीला अभिप्रेत राजकारण होणे आवश्यक आहे.
तसेच अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत (Andheri By Election) महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचाच विजय होईल,
असा विश्वास देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाने उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लटके यांना त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचा अंतरिम आदेश दिला आहे.
Web Title :- Andheri By Election | BJP is doing very low level politics in Andheri by-election – Balasaheb Thorat
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…