मध्यमवर्गीय, शेतकरी, श्रमिकांसाठी महत्वाचा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पाबाबत बोलताना शहा म्हणाले, मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या अंतिम अर्थसंकल्पामुळे लघुद्योगाला उत्तेजन मिळणार आहे. कामधेनू योजनेमुळे गायींच्या सुरक्षेमध्ये वाढ होण्यास मदत होईल. तसेच मध्यमवर्गीय, शेतकरी, श्रमिकांसाठी हा अत्यंत महत्वाचा अर्थसंकल्प ठरेल, असेही शाह म्हणाले. मच्छिमारांसाठी मत्स्यपालन विभाग बनविण्यात आला आहे. मच्छिमार बांधवांच्या कल्याणासाठी आमच्या सरकारने हे काम केले असल्याचे शाह म्हणाले. प्रधानमंत्री श्रमदान मानधन योजना गरिबांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचाही दावाही शाह यांनी यावेळी केला.
महात्मा गांधी, विनोबा भावेंनी गायीचे महत्त्व सांगितले होते. त्यानुसार आमचा पक्ष काम करत आहे. देशातील गोमाता सुरक्षित राहाव्यात यासाठी आमचा कामधेनू आयोग कार्यरत राहिल, असेही शाह म्हणाले.आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत मोदी सरकारने संरक्षण खात्यासाठी विशेष सहाय्य केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे, असेही शाह म्हणाले.