Coronavirus : दिवे लावूच, पण आर्थिक संकटाचे बोला, PM मोदींवर काँग्रेस नेत्यांकडून टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यानंतर आता रविवारी (दि.5) रात्री 9 वाजता 9 मिनिटे दिवे जाळून सामूहिक शक्ती दाखवा असे आवाहन पंतप्रधान मोदीं यांनी एका व्हिडिओ कोरोनाशी लढणाऱ्या देशातील जनतेला केले आहे. मात्र, यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोंदीवंर टीका करताना म्हटले आहे की, आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही साथीच्या आजाराचे तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ काय म्हणतात ते ऐकावे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींना प्रति आवाहन केले आहे.
चिदंबरम यांनी म्हटले आहे की, तुम्ही आज गरिबांसाठी एका पॅकेजची घोषणा कराल. ते करण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना विसरल्या आहेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रतिकवाद महत्त्वाचा आहे, मात्र विचार आणि उपचारासांठी गंभीर विचार देखील तितकाच महत्त्वाचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही पंतप्रधानांवर टीका केली आहे. आज देशाने पुन्हा प्रधान शोमॅनना ऐकले, असे थरुर म्हणाले, त्यांनी लोकांची दु:ख आर्थिक संकटाबाबत काहीही म्हटले नाही. भविष्यासाठी काय योजना आहेत, तसेच लॉकडाऊननंतर काय होईल, अशा मुद्यांवर काहीही म्हटले नाही. फक्त एक फिलगुड स्थिती निर्माण केली, असे थरुर म्हणाले

कपील सिब्बल यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, विषाणूचा प्रसार रोखणे, तपासणी किट्स, गरिबांना जेवण पोहचविणे, गरिब मजुरांना आर्थिक मदत करणे अशा मुद्यांवर काहीही ऐकायला मिळाले नाही, दिवा हा एखाद्या उद्देशासाठी पेटवा, अंधश्रद्धेसाठी नाही.