नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत स्वीकाराव्या लागलेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे. त्याआधी भारतीय संघाविषयी पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा करणारी बातमी समोर आली आहे.
गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुरावा असल्याचे म्हटले गेले आहे. त्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद दिले जाणार असल्याच्या देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत होत्या. मात्र रविवारी झालेल्या बैठकीत निवड समितीने या दौऱ्यात विराट कोहली यालाच कर्णधार म्हणून ठेवले आहे. मात्र या दोघांमधील दरी अजूनही मिटली नसल्याची माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मनमानी निर्णयामुळे भारताला सेमीफायनलमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या दोघांना पदावरून हटवण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पुढे येत होती. त्याचबरोबर विराट कोहली याचा कारकिर्दीत भारतीय संघाने एकही मोठी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी रोहित शर्मा याची निवड करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुरावा निर्माण होण्याचे कारण समोर आले आहे.
शमी आणि जडेजा आहे कारण
खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रोहित आणि विराट यांच्यात दुरावा निर्माण झाला तो सेमीफायनलमध्ये. मोहम्मद शमी याने उत्तम कामगिरी केलेली असताना देखील संघाबाहेर केल्याने रोहित आणि विराट यांच्यात दुरावा आल्याचे या संस्थेने म्हटले आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा याला देखील जास्त संधी न दिल्याने रोहित शर्माने आपली नाराजी व्यक्त केली होती. सेमीफायनलमध्ये जडेजाने केलेल्या उत्तम फलंदाजीमुळेच भारताला मानहाणिहारक पराभव थोडक्यात टाळता आला. त्याचबरोबर आणखी देखील अनेक मुद्दे देखील या दुरीला असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
दरम्यान, कर्णधार विराट हा विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणार होता. मात्र कर्णधारपदाची टांगती तलवार डोक्यावर असल्याने त्याने या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
- अॅसिडीटी नष्ट करण्यासाठी ‘हे’ ९ रामबाण आयुर्वेदिक उपाय, जाणून घ्या
- दही खाण्याची पद्धतदेखील वाढवू शकते तुमचे वजन, जाणून घ्या
- घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या
- ‘या’ पानाचे ‘हे’ १० फायदे, खोकला, पायरियासह अनेक रोगांतून मिळेल मुक्ती
- निरोगी शरीर आणि ताकदीसाठी ‘या’ ७ खास भाज्या, जाणून घ्या