Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे आणखी 55 नवे रूग्ण आढळले, महाराष्ट्राचा आकडा 690 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. आज (रविवारी) पुण्यात तिघांचा तर औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुपारी 3 वाजेपर्यंत कोरोनाचे आणखी 55 नवे रूग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 690 वर जाऊन पोहचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरव्दारे दिली आहे.


कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाटल्यानं वाढत आहे. काल (शनिवारी) लातूर जिल्हयात कोरोनाचे 8 रूग्ण आढळून आले होते तर उस्मानाबादमध्ये देखील रूग्णांची संख्या 3 वर गेली आहे. आज पुण्यात कोरोनामुळं तिघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे तर औरंगाबाद येथे शासकीय रूग्णालयात एकाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात 55 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये मुंबई-29, पुणे-17, पिंपरी-चिंचवड-4, अहमदनगर-3, औरंगाबादमधील 2 रूग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 690 वर जाऊन पोहचली आहे.