भाऊजींची तब्येत खराब झाल्याचं सांगत नवरी 2 लाख घेऊन ‘गायब’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मध्य प्रदेशच्या दमोहमधून फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका नवरीनं भाऊजींची तब्येत बिघडल्याचं सांगत सासर सोडून पळ काढला आहे. तिनं सासरच्या मंडळींची फसवणूक केल्याचं समोर आलंआहे. फसवणुकी यांनी जुळवलं होतं. तिघांनीही लग्नाच्या बदल्यात पुष्पेंद्रकडून 2 लाख रुपये घेतले होते.

फरार झाली लुटेरी दुल्हन
लग्न झाल्यानंततर दोन महिन्यांनी प्रीतीनं सांगितलं की, भाऊजींची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला माहेरून फोन आला आहे. त्यानंतर पुष्पेंद्र पत्नी प्रीतीसोबत जबलपूरला आला आणि सीमा दुबेच्या सांगण्यावरून त्यानं पत्नीला तिथंच ठेवलं. यानंतर पुष्पेंद्र घरी आला.

खूप दिवस उलटले पत्नी आली नाही म्हणून त्यानं पत्नीला फोन केला. परंतु फोन काही लागला नाही. जेव्हा तो पत्नीला भेटण्यासाठी जबलपूरला गेला तेव्हा ती तिथं नव्हती.

पुष्पेंद्रनं सांगितलं की, जेव्हा त्यानं अनेकदा पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीच संपर्क झाला नाही. त्याला सीमा दुबे आणि राज दुबे यांनी धमकी दिली की, इथून जा, नाहीतर चांगलं होणार नाही. त्यांना घाबरून पुष्पेंद्र घरी परतला. नंतर त्यानं याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.