कोलकता : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. निवडणुकांच्या काळात प.बंगालमध्ये कायमच हिंसाचाराच्या घटना घडतात. नुकत्याच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या हिंसाचारात १०० लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता आहे . असे सांगत त्यांनी या राज्याला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. माध्यमांशी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले , आम्हाला पश्चिम बंगालमधील स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही . त्यामुळे या राज्यात स्थानिक पोलीसांच्या सुरक्षेखाली निवडणुका घेऊ नयेत , त्यासाठी इथे सीआरपीएफची नियुक्ती करण्यात यावी.
Union Minister Ravi Shankar Prasad after BJP delegation meeting with Election Commission in Delhi today: We have conveyed to the EC that Bengal's track record in free & fair election is very very deplorable. Recently, 100 people were killed during local body&gram panchayat polls. https://t.co/pbgPOe8lOL
— ANI (@ANI) March 13, 2019