Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | ‘वेळ आली तर सत्तेला ठोकर मारायला आम्ही तयार’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीला (BJP-Shiv Sena Alliance) 165 जागा देऊन निवडून दिलं. पण उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) खूर्चीच्या लालसेपोटी भाजपची साथ सोडली, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर जिल्ह्यातील पार शिवणीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. (Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi)

 

मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात जुलमी सरकार राज्य करत होतं, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला. सकाळी 9 वाजता भोंगा सुरु होतो तो थेट रात्री 10 वाजता बंद होतो, असा टोलाही फडणवीस यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना लगावला आहे. (Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi)

 

ठाकरे फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले

अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले, हे मी म्हणत नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या आत्मचरित्रात (Autobiography) लिहिलं आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या प्रतिमेवर विपरित परिणाम झाला हे त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले. आपल्यासोबत युतीमध्ये निवडून आले, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्याची खुर्ची (Chief Minister Chair) पसंत आली आणि खुर्चीच्या लालसेने त्यांनी आपली साथ सोडली. त्या खुर्चीसाठी त्यांनी काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीची (NCP) साथ पकडली, अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

 

तर सत्तेला ठोकर मारु

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हे सरकार सत्तेकरता तयार नाही केलं, हे विचारांकरता तयार केलेलं सरकार आहे. सत्ता येते, सत्ता जाते मात्र विचारांकरताची आमची लढाई कधीच संपू शकत नाही. सत्तेला आम्ही ठोकर मारतो. विचार सोडायची वेळ आली तर सत्तेला ठोकर मारायलाही आम्ही तयार आहोत.

 

 

 

सकाळी 9 वाजता भोंगा सुरु होतो

आपले विरोधक रोज जहर उगळतात. हे रोज खोटं बोलून जहर पाजतात. सकाळी नऊ वाजता खोटं बोलण्याऱ्यांचा भोंगा सुरु होतो,
ते रात्री दहा पर्यंत सुरु असतो. हे स्वत: काही करत नाहीत. सत्तेत असतात तेव्हा बदल्यांमध्ये पैसे खातात.
हे सत्तेवर असतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी करतात. हे सत्तेवर असतात तेव्हा गरिबांचा घास छिनून घेतात.
पण सत्तेबाहेर गेले की रोज खोटं बोलून लोकांच्या मनात संभ्रम पैदा करतात, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

Web Title :  Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | BJP leader devendra fadnavis said then we will come out from government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा