धुळे : लळिंग घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रं.3 वर राञी विचिञ घटना घडली. पाण्याच्या व शिकारीच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या हा लळिंग कुरणातुन बाहेर आला. व रस्ता ओलाडुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतेवेळी महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली यातच बिबट्या रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन जागीच ठार झाला.

हि बाब शनिवारी राञी अकरा दरम्यान घडली. नागरीकांच्या लक्षात आल्यावर वन विभाग अधिकारी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पहाणी करुन बिबट्याचे पोसमार्टे केले.

जंगल भागात कृञिम पाणतळे तयार केले. त्यांची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी कृञिम पाणतळे आहेत, पण त्यात पाणीच नाही अशी स्थिती असल्याने पाण्याच्या शोधात वन्य जिव भटकंती करत रस्त्यावर आल्याने वाहनाच्या धडकेत ठार होतात. अशा अनेक घटना घडतात पण वन विभाग त्याकडे लक्ष देत नाही. वन विभागाचे वन्य जीवांकडे दुर्लक्ष होत आहे. हे ह्या बाबीवरुन लक्षात येत. अगोदर हि शिरपुर व लळिंग घाटात व साक्री पट्टयात वाहन धडकेत बिबट्या ठार झाले आहेत.

पाण्याच्या शोधातच बिबट्या ठार झाल्याची चर्चा लळिंग गावातील ग्रामस्थ करत आहे. वन विभाग पट्टा भाग मोठ्या प्रमाणात आहे. परंतु वन विभागाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. जंगल तोड हि होते. गुरे चारण्यासाठी लळिंग कुरणात सोडली जातात. वन्य जिवांना हुसकावून लावण्याचा प्रकार तर नाही ना अशा अनेक उलटसुलट चर्चा बिबट्या ठार झाल्याने ग्रामस्थांमध्ये सुरु होत्या. अनेक सामाजिक संघटना व  ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. वन विभाग झोपेचे सोंग घेत असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

Visit : Policenama.com