‘विमानासाठी इंधन नाही’ अन चाललेत भारताला नडायला 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने एअर स्ट्राईक नंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमाने भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला आहे. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमाने पळवून लावली आहेत.
तसेच पाकिस्तानची मान शरमेने खाली जाणारी बाब समोर आली आहे. पाकिस्तानने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी पुरेसा इंधनसाठाच उपलब्ध नाही असे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे.  त्यामुळे भारताकडून बदला घेण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने स्वतःची परिस्थिती पाहिलेलीच नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारताने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जाऊन एअर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. बदला घेण्याची भाषा पाकिस्तानकडून केली जात आहे. जम्मू काश्मीरमधील नौसेरा भागात पाकिस्तानने विमाने घुसवून भीती दाखवण्याचा प्रयत्न ही  केला आहे. पण भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचे  F-16 हे विमान पाडले आहे.तसेच खबरदारीचा उपाय म्हणून देशातील काही विमानतळे आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमधील जैसलमेर हे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेले  शहर आहे. या शहरातील गावे  खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय गुजरातमधील पूँछमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.