ESIC चा मोठा निर्णय, बेरोजगार भत्त्यासाठी क्लेमची डेडलाइन वाढवली, परंतु जाणून घ्या या आवश्यक गोष्टी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे ज्यांची नोकरी गेली आहे, त्यांना आता अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारने बेरोजगारी भत्त्याच्या क्लेमसाठी शेवटची तारीख 30 जून 2021 केली आहे. म्हणजे कोरोना काळात नोकरी गमावणारे कर्मचारी जे अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत इन्श्युर्ड आहेत, ते तीन महिन्याची 50% सॅलरी मिळवण्यासाठी आता 30 जून 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
दूसरीकडे ज्या लोकांनी 24 मार्चपासून 31 डिसेंबर 2020च्या दरम्यान नोकरी गमावली आहे, ते या योजनेंतर्गत तीन महिन्यांसाठी 50% सॅलरी मिळवू शकतात. त्या कामगारांना सुद्धा याचा लाभ मिळेल, ज्यांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. देशात अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेला अतिशय कमी प्रतिसाद मिळत असल्याने कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ईएसआयसी अंतर्गत हे करू शकतात अर्ज
ईएसआयसी अंतर्गत विमाधारक कुणीही व्यक्ती कर्मचारी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज दाखल करू शकतो. हा भत्ता तीन महिन्याच्या निम्म्या सॅलरीच्या रूपात दिला जाईल. ईएसआईसी यासाठी 44 हजार कोटी रूपयांची तरतूद करणार आहे. ईएसआयसीने हा बेरोजगार भत्ता 19 सप्टेंबरला बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी 25 टक्क्यावरून वाढवून 50 टक्केपर्यंत वाढवला होता. परंतु, बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज करणार्यांची संख्या खुपच कमी असल्याचे दिसत आहे. कामगार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या आतापर्यंत 5 लाख कर्मचार्यांनी या भत्त्यासाठी अर्ज केलेला नाही. हे पाहता अर्ज करण्याची मुदत आणखी वाढवली आहे.
असा करू शकता क्लेम
50 टक्के सॅलरीच्या क्लेमसाठी कर्मचार्याला ईएसआयसीच्या पोर्टलवर ऑनलाईन क्लेमफॉर्म भरून सबमिट करावा लागेल आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंटआऊट, एफिडेव्हिट, बँक अकाऊंट डिटेल्स आणि आधार कार्डच्या कॉपीसह संबंधित ईएसआयसी शाखेत जमा करावे लागेल. पोस्टाद्वारे सुद्धा किंवा स्वता जाऊन तो जमा करू शकता. देशात सध्या 3.49 कोटी कुटुंब ईएसआयसीमध्ये रजिस्टर आहेत, ज्याअंतर्गत 13.56 कोटी लोकांना याच्याशी संबंधित आरोग्य सेवा मिळत आहेत.