काश्मीरमध्ये पाच पाकिस्तानी सैनिक ठार
Kashmir: Four Pakistani soldiers killed by Indian fire
श्रीनगर: वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तान करत असल्याने आज याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पुंछ आणि राजौरी भागात झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले असून वीस नागरिक जखमी झाले आहेत. यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानचे तीन बंकरही उद्ध्वस्त केले आहेत
पाकिस्तानने पुंछ आणि राजौरी भागात आज पहाटे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले असून २० पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत. ‘सुंदरबनी’ आणि ‘देहगांव’ येथे पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले.