Hasan Mushrif | ‘जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानचा शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही’ – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑलाइन – Hasan Mushrif | कोल्हापुरात (Kolhapur News) झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच, त्यामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, औरंगजेब हा आपला शत्रूच आहे,” असे मुश्रीफ यांनी म्हटले. ”धर्मा-धर्मात तेढ वाढवून सामाजिक विद्वेष करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी कितीही चिथावणी देऊ देत. अशा चिथावणीखोरांना बळी पडू नका. सावध राहा-दक्ष रहा,” असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले. ते कोल्हापुरात बोलत होते.

 

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांना मुस्लिम समाजाविषयी (Muslim Community) कधीच आकस नव्हता. मुस्लिम समाजाचीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तितकीच गाढ श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार आणि इतर चाकरही होते. महाराजांच्या सैन्यदलाचा प्रमुख दौलतखान, महाराजांना जीवाला जीव देणारा आणि त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारा त्यांचा अत्यंत विश्वासू व खास अंगरक्षक मदारी मेहत्तर हे मुस्लिमच होते. तसेच, वकील काजी हैदर, सिद्धी हिलाल, शामाखान, नूरजहा बेगम असे 22 सरदार महाराजांकडे होते.

पुढे मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एवढे प्रमुख मुस्लिम असतील
तर त्या सैन्यात मुस्लिम मावळे किती असतील, याचीही प्रचिती येते.
75 वर्षांपूर्वी हिंदुस्थान (India) आणि पाकिस्तान (Pakistan) अशी फाळणी झाल्यानंतर भारतमाता हीच आमची आई आहे.
या मातृत्वाच्या भावनेतूनच हिंदुस्तानी मुस्लिम समाज या मातीत राहिला.
सामाजिक विद्वेषातून दंगे-धोपे आणि दंगली घडविणे हा काही लोकांचा अजेंडाच आहे.
कोणत्याही बहकाव्यामध्ये येऊन, या अजेंड्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाने आपल्या लहान,
अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या हातून अशा गोष्टी घडणार नाहीत, याचीही दक्षता घेण्याचे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.

 

Web Title :  Hasan Mushrif | ncp leader hasan mushrif says on kolhapur violence
shivaji maharaj enemy is india enemy aurangzeb cannot be ours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा