मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला खातेवाटपाचा विषय अखेर मार्गी लागला असून प्रत्येकाला आता जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माणमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘चाळीतून जितेंद्र आव्हाडांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच इथपर्यंतची मजल गाठता आली,’ अशी भावनिक प्रतिक्रिया आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेच्या बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झाला. मात्र, त्यानंतरही खातेवाटपावरून जवळपास राजकीय नाट्य सुरु सुरु होत. त्यांनतर अखेर नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.
ठाकरे सरकारच्या या मंत्रिमंडळाच्या यादीत कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खात्याचे मंत्रीपद देण्यात आलं. खातेवाटप जाहीर होताच, आव्हाड यांनी ट्विटरवरुन भावनिक प्रतिक्रिया दिली. ‘लहानपणी एका चाळीतील एका खोलीत राहणार मुलगा आज राज्याचा गृहनिर्माण मंत्री बनला, ही किमया करण्याचं काम फक्त आणि फक्त शरद पवार हेच करू शकतात, अशी भावनिक आणि बोलकी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.
आव्हाड यांचे हे ट्विट ‘राजकारण हे सामान्य माणसांचं काम नाही,’ असं म्हणणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारं ठरणार आहे.
लहानपणीचा घरचा पत्ता –
चाळीचे नाव श्रीपत भवन,
खोली क्रमांक ६,
वाडिया स्ट्रीट,
ताडदेव.
मुंबई..आणि आज चाळीचा विकास करणार गृहनिर्माण मंत्री पद.
हि किमया फक्त आणि फक्त #शरद_पवार साहेबच करू शकतात. #गृहनिर्माण_मंत्री— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2020
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- मेहनत करूनही ‘सिक्स पॅक अॅब्स’ होत नाहीत ? मग ‘या’ 5 टिप्स जाणून घ्या
- मच्छरांबद्दलच्या ‘या’ 6 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ? जाणून घ्या
- आठवड्यातील ‘हा’ वार आहे सर्वात ‘डिप्रेसिंग’, जाणून घ्या 4 कारणे
- ‘किडनी स्टोन’ असताना ‘या’ 8 पदार्थांचे सेवन पडू शकते महागात !
- ‘या’ 5 गोष्टी आहेत डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर
- तासनतास बसून काम केल्याने होतात ‘या’ 4 समस्या, जाणून घ्या
- जिभेच्या 5 प्रकारावरून ओळखा तुम्हाला कोणता आजार झालाय