काय होते प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी टीलाजमालपुरा येथील एका पीडित महिलेने जिल्हाधिकाऱ्यांचा लोकअदालतीमध्ये म्हणजेच एडीएम दिशा नागवंशींसमोर आपली व्यथा मांडली. पीडिताने सांगितले की, 25 जुलै 2015 रोजी मुस्लिम परंपरेनुसार आमचे लग्न झाले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मला समजले की, माझ्या पतीचे या अगोदरच एक लग्न झालेले आहे. आणि जिच्याशी लग्न झाले त्या महिलेला पतीकडून दोन मुली देखील आहेत. मी या लग्नाचा विरोध केला असता पती, नणंद व तिची मुलगी यांनी मला खूप मारले.
त्याचबरोबर सासरचे लोक माझ्या स्वर्गीय वडिलांच्या वारसा हक्कामध्ये मिळणाऱ्या घरामध्ये हिस्सा आणि पैशांची मागणी करत आहेत. यासाठी रोज माझा छळ केला जातोय. मला घरात कैद्याप्रमाणे वागणूक दिली जाते. आपण याप्रकरणात सासरच्या मंडळींविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पीडिताने केली आहे. एडीएमने हे प्रकरण महिला सशक्तिकरण अधिकाऱ्यांकडे सोपवले आहे.