मनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होतोय : जितेंद्र आव्हाड

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

मनुवाद्यांमुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान होतोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर निवेदन देत असताना ही भूमिका मांडली आहे. आरोप करणे ही यांची संस्कृती आहे. पारंपारिक हिंदू संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम हे लोक करत आहेत. यांच्यामुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान होण्यास वेळ लागणार नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.
[amazon_link asins=’B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’35df44ae-a47a-11e8-8c11-99c54553c73f’]

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी वैभव राऊतला पकडल्यानंर त्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून याला लवकरच आळा घातला पाहिजे.

फेसबुक पेजवरच्या निवेदनात त्यांनी डाॅ. नरेंद्र दाभोलकर,गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गोरी लंकेश यांच्या हत्यांचाही उल्लेख केला आहे. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी हे सचिन अंदुरेपर्यंत पोहचले आहेत. त्यांचे अभिनंदन करतो मात्र या विवेकवादी लोकांना मारणाऱ्यांचे हात शोधलेत आता यामागचे बाप अर्थात सूत्रधार कोण आहेत तेदेखील शोधा असेही आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच या लोकांनी विवेकवादी लोकांनाच ठार का केले? पाकिस्तानात जाऊन झकीर उर रहमान लख्वीला किंवा हाफिज सईदला गोळ्या घालण्याची हिंमत यांनी का दाखवली नाही असा प्रतिप्रश्नही आव्हाड यांनी आपल्या साडेचार मिनिटांच्या निवेदनात विचारला आहे.

अशाच प्रकारे 2002-2003 च्या दरम्यान हिमांशू पानसे या मनुवादी कार्यकर्त्याच्या घरी पहिल्यांदा बाॅम्बस्फोट झाला त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्याबद्दल खंत व्यक्त केली तो सुनील जोशी पुढे मालेगाव बाॅम्बस्फोटात आरोपी म्हणून सापडला. मी त्या दिवसापासून हे सांगतो आहे की या मनुवाद्यांपासून देशाला मोठा धोका आहे. अतिरेकी मुस्लिम असो की हिंदू असो कारण अतिरेकी अतिरेकिच असतो, तो देशाचा शत्रुच असतो.
[amazon_link asins=’B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ba5b1ba-a47a-11e8-82a4-29112caa3c11′]

केवळ ते हिंदू आहेत किंवा मनुवादी आहेत म्हणून त्यांच्या विरोधात कमी बोलणे हे न्यायाला धरून नाही असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. मडगावचा बॉम्ब स्फोट असो, मिरजेची दंगल असो किंवा जोधा अकबरचे प्रकरण असो यामागे कोणाकोणाचे हात आहेत? संविधान, कायदा यांना न घाबरणारे टोळके तयार करण्याचे काम सुरू आहे असाही आरोप आव्हाड यांनी केला.

इतर बातम्या

बिबवेवाडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

‘उमर खालिद’ हल्ल्याप्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात