हैदराबाद : वृत्तसंस्था
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात हैदराबाद येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात एका चाहत्याने विराटसोबत सेल्फी घेण्याच्या वेडापायी मैदानातील सुरक्षेचं कडं भेदून चक्क मैदानात धाव घेतली .पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये १५ व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. विराट मैदानात क्षेत्ररक्षण करत असताना या उत्साही चाहत्याने सुरक्षा घेरा तोडून मैदानात प्रवेश केला आणि विराटसोबत सेल्फी काढली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1d78b28-ce18-11e8-ae62-d305db62f8e9′]
यापूर्वीही राजकोट कसोटीत असा प्रकार घडला होता. असाच काहीसा प्रकार रणजी सामन्यातही झाला होता. त्यावेळी चक्क एका चाहत्याने कारच मैदानावर घातली होती. या घटनेमुळे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान पुन्हा एकदा मैदानावरील सुरक्षा यंत्रणेला आव्हान मिळाले आहे.
या कारणामुळे अक्षयने ‘हाऊसफुल्ल 4’ चं शूटिंग रद्द केलं !
हैदराबाद येथे आजपासून दुसऱ्या कसोटीला सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतली. राजकोट येथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात अवघ्या तीन दिवसांमध्येच वेस्ट इंडिजला हरवले. २०११ च्या दौऱ्यात भारताने विंडीजला २-० असे पराभूत केले होते, तर २०१३ मध्ये त्यांनी दोन्ही कसोटी सामने तीन दिवसांच्या आतच संपवून विजय मिळवला होता . यंदाही भारताला ही सुवर्णसंधी आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f7d3d7c4-ce19-11e8-a352-f51423769cb0′]