… तर विराटला कर्णधारपदावरून हटवल असत, गौतम गंभीरचा निशाणा

पोलीसनामा ऑनलाईन : आपल्या पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या संघाचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले आहे. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या( captain-virat-kohli) RCB वर 6 गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चे स्पर्धेतले आव्हानही संपुष्टात आले. विजयासाठी दिलेले 132 धावांचे आव्हान हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केले. यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर( gautam-gambhir) याने आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. आता वेळ आली आहे जेव्हा बंगळुरूला कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या पुढे विचार करावा लागेल. जर बंगळुरूच्या टीम मॅनेजमेंटमध्ये आपण असतो तर विराटला कर्णधारपदावरून हटवले असते, असे मत गंभीरने व्यक्त केले आहे.

आता संधी आहे जेव्हा विराट कोहलीने पुढे यावे आणि याची जबाबदारी स्वीकारावी, असं गंभीरने क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले. जर फ्रेन्चायझीचे प्रभारी असता तर संघाचा कर्णधार बदलला असता का ? असा सवाल गंभीरला केला होता. 100 टक्के…समस्या उत्तर देण्यात आहे. कोणत्याही स्पर्धेत आठ वर्ष हा मोठा कालावधी असतो. कर्णधाराच्या बाबतीत विसरून जा. पण कोणताही असा खेळाडू सांगा जो आठ वर्ष झाली असेल आणि एकदाही स्पर्धेचे विजेतेपद पटकावले नाही. एका कर्णधाराला उत्तर देणे आवश्यक आहे, असे गंभीरने सांगितले.

केवळ या वर्षाची गोष्ट नाही. मी विराट कोहलीच्या विरोधात बिलकुल नाही. परंतु कुठे ना कुठे त्याला यासाठी मी जबाबदार आहे असे म्हणत जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे, असेही तो म्हणाला. रविचंद्रन अश्विनच्या बाबतीत काय घडलं? किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये त्याची कामगिरी उत्तम झाली नाही त्यानंतर त्याला हटवले. आपण धोनीच्या, रोहितच्या बाबत चर्चा करतो. परंतु विराट कोहलीबाबत बिलकुल बोलत नाही. धोनीने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माने चार वेळा. स्वत:ला सिद्ध केल्यामुळेच त्यांनी मोठ्या कालावधीसाठी कर्णधारपद भूषवले आहे. रोहितने आठ वर्षांपर्यंत स्वत:ला सिद्ध केले नसते तर त्यालाही हटवण्यात आले असते याची मला खात्री आहे. निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळी गोष्टी असू नये, असेही गंभीरनं स्पष्ट केले आहे.