पाकिस्तानवर पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक; भारताने नव्हे इराणने केली कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम –     पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती समोर आलीय. यावेळी भारताने नव्हे तर इराणने पाकिस्तानच्या आत शिरून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या 2 सैनिकांनाही त्यांनी मुक्त केलंय. पाकिस्तान देशावर सर्जिकल स्ट्राईक करणारा इराण हा तिसरा देश आहे. याअगोदर भारत व अमेरिकेने देखील पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मंगळवारी रात्री इराणने सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती समोर आलीय. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत दशतवाद्यांना कव्हर देणारे पाकिस्तानचे काही सैनिकही ठार झालेत.

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पाकिस्तानच्या सीमेतर आतवर शिरून हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलाय. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असेलल्या आपल्या दोन सैनिकांनाही सोडवलं आहे. पाकिस्तानने अवैधरित्या कब्जा केलेल्या बलुचिस्तानमध्ये शिरून जैश-अल-अदलच्या ताब्यात असेलेल्या आपल्या सैनिकांना सोडवलं आहे, अशी माहिती इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने दिलीय.

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनं यासंदर्भात एक अधिकृत माहिती देऊन या कारवाईला दुजोरा दिलाय. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाकिस्तानच्या आत शिरून आपल्या सैनिकांना सोडवलंय. दहशतवादी संघटनांकडून सैनिकांचे अपहरण केलं होतं. त्यानंतर याविरोधात मंगळवारी कारवाई केलीय, असं इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सकडून सांगण्यात आलंय.

जैश उल-अदल अथवा जैश अल-अदल ही दशतवादी संघटना दक्षिण पूर्व इराणमध्ये सक्रिय असून या दहशतवादी संघटनेने याअगोदर इराणमध्ये नागरी परिसरात आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले केले होते. याशिवाय बलुचिस्तानमधील नागरिकांच्या नरसंहारासाठी त्यांना पाकिस्तानी लष्कराकडूनही समर्थन मिळतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी ईराणच्या जवानांचे 2018 मध्ये अपहरण केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यांना ठेवलं होतं. परंतु आता सर्जिकल स्ट्राईकद्वारे त्यांना सोडविण्यात आलंय.