भारतीय तपास यंत्रणा मला तुरुंगात टाकण्यासाठी काहीही करु शकतात ; दहशतवाद पसरवणाऱ्या जाकीर नाईकचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात दहशतवादी कारवायांना पाठबळ देणारा आणि मनी लॉन्ड्रींगचा आरोप असलेल्या जाकीर नाईकने आता मोठे विधान केले आहे. भारतीय तपास यंत्राणा कोणत्याही ट्रायल शिवाय, कोणत्याही सुनावणी शिवाय मला तुरुंगात टाकण्याचा विचार करत आहे. जाकीर नाईकने पुढे सांगितले की भारतीय तपास यंत्रणा एवढ्या उतावळ्या आहेत का? का ते आपल्या राजकीय नेत्यांना खूश करण्यासाठी हे सगळं करत आहेत.

जाकीर नाईकची भारतील ओळख तेव्हा वाढली जेव्हा तो भारतात प्रसारित होणाऱ्या टीव्ही चँनेल वरुन भारतातील तरुणांना आणि मुसलमान धर्मियांना इस्लाम शिकवत होता. याचा वापर करुन तो भारतात दहशतवादाची मुळे रोवण्याचा प्रयत्न करीत होता. त्या चँनेल्सवर भारत सरकारने अखेर बंदी आणली.
परंतु जाकीर नाईक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ते त्यांने केलेल्या वक्तव्यामुळे. जाकीर नाईकने भारतीय तपास यंत्रणेवर निशाणा साधत टीका केली आहे. तो म्हणाला की, हे तेवढेच खरे आहे की यांने न्याय मिळणार नाही, हा प्रकार वाईट आहे की ते मला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आणि ते त्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधत आहेत.

नाईकवर दहशतवादापासून ते मनी लॉन्ड्रीग पर्यत आरोप आहे. नाईकने आरोप केला आहे की भारतीय तपास यंत्राणा मला तुुरुंगात टाकण्यासाठी काहीही करु शकतात. उवढेच नाही तर कोणताही तपास न करता किंवा कोणतीही सुनावणी न करता ते मला तुरुंगात पाठवण्याची तयारी करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय