Jitendra Awhad On Dhananjay Munde | ‘बरगड्या मोडतील-नादाला लागू नका’, धनंजय मुंडेच्या इशाऱ्याला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर म्हणाले-‘महाराष्ट्रमध्ये कोथळा बाहेर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jitendra Awhad On Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अजित पवार गट (Ajit Pawar Group) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार सभा घेऊन टीका करत आहेत. तर शरद पवारांच्या टीकांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून उत्तरसभा घेतली जात आहे. दरम्यान, या संभांमधून अजित पवार गटातील मंत्री शरद पवार गटातील नेत्यांवर हल्लाबोल करत जुन्या आठवणींना उजाळा देऊन प्रश्नांचा भडीमार करत आहेत. कोल्हापूर येथे झालेल्या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी बरगड्या राहणार नाहीत असा इशारा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad On Dhananjay Munde) यांना दिला होता. त्यानंतर आता आव्हाड यांनी आपल्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chife Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये सभा घेतली होती. या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी, राष्ट्रवादीमधील गद्दारांना कोल्हापुरी पायताण दाखवा, असं हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) उद्देशून बोलले होते. या टीकेला स्वत: हसन मुश्रीफ यांनी करकरीत कापशीचं कोल्हापुरी पायताण बसलं की कळेल, असं उत्तर दिलं होतं. या दोन नेत्यांमध्ये जुंपली असताना यामध्ये धनंजय मुंडे यांनी उडी मारली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, ज्याने कुणी कोल्हापुरात येऊन पायताणाची भाषा केली त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी
मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का? असा सवाल आव्हाडांना करत एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन
मुश्रीफ यांच्यावर आरोप कराल तर करवीरनगरीतील जनता माफ करणार नाही,
असा इशारा धनंजय मुंडे यांनी कोल्हापूरच्या सभेत दिला. (Jitendra Awhad On Dhananjay Munde)

धनंजय मुंडे यांच्या बरगड्या मोडण्याच्या इशाऱ्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर
जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की,
बनवा बनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो.
हे कायम लक्षात ठेवा, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या इशाराचा समाचार घेतला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Manoj Jarange On Prithviraj Chavan | पश्चिम महाराष्ट्राने काय घोडं मारलं आहे? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले – “निजाम घेऊन जायचा…”