कपिलच्या शोमुळे मी घराघरांत पोहोचलो – सुनील ग्रोव्हर  

मुंबई : वृत्तसंस्था – कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांनी कपिल शर्मा शो च्या माध्यमातून प्रेक्षकांना खूप हसवले. ही दोघे असेच हसवतील असेही प्रेक्षकांना वाटत होते पण दोघांमध्ये भांडण होऊन ही जोडी तुटली. या नंतर कपिल ने अनेक प्रयत्न करून सुनील ची मनधरणी केली पण सुनीलने कपिलसोबत काम करण्यास ठाम नकार दिला होता. एका इव्हेंटमध्ये सुनील ग्रोव्हर जे काही बोलला, त्यावरून आता असे दिसून येत आहे की, या दोघांमधील मतभेद बरेच निवळले आहेत. कपिल शर्माचा शो हा माझ्या करिअरला कलाटणी देणारा होता. कपिल शर्माच्या शोने मला प्रचंड प्रेम दिले ओळख दिली. याच व्यासपीठामुळे मी घराघरांत पोहोचलो, असे सुनील म्हणाला.

मी कपिलला शोच्या अगोदर पासून ओळखत होतो. कॉमेडी सर्कसच्या शूटदरम्यान आम्ही एकमेकांना भेटलो होतो. किकू सोबत तर मी खूप पार्ट्या केल्यात. कपिल शर्माच्या शोमध्ये आम्ही सर्वांनी एकत्र काम केले. मी परमेश्वराचे आभार मानतो की, मी या शोचा भाग होतो. कालांतराने मी या शोमधून बाहेर पडलो. कारण काहीही असो, पण या शोमधून बाहेर पडल्याचे मला दु:ख आहे आणि कायम असेल. अनेक गोष्टी विधीलिखीत असतात. कदाचित आमची सोबत इथपर्यंतचं लिहिली होती, असेही सुनील म्हणाला.

सुनील ग्रोव्हरसोबत भांडण झाल्यानंतर कपिलचा शो बंद पडला. यानंतर कपिल डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले. पण आता कपिल पुन्हा नव्या दमाने टीव्हीवर पतरला आहे. त्याचा कपिल शर्मा शो पुन्हा एकदा हिट झाला आहे. दुसरीकडे सुनीलचा ‘कानपूरवाले खुराना’ हा कॉमेडी शोही चर्चेत आहे.