नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश सकट अनेक ठिकाणी देशात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पुरस्थितीमुळे १५० हुन अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. हवामान खात्याने जोरदार वाऱ्यासह केरळमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. एन डी आर एफच्या टीम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तैनाद करण्यात आल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह आज कर्नाटकच्या ‘बेळगाव’चा दौरा करणार आहेत तर राहुल गांधी आज ‘वायनाड’च्या दौऱ्यावर असतील.
Due to flooding, land slides and trees & boulders falling on railway tracks caused by heavy rains, and consequent disruption of rail traffic, following changes have been made in train services in #Kerala. pic.twitter.com/QU44G6Kn2O
— ANI (@ANI) August 11, 2019
कर्नाटकमध्ये आतापर्यंत ३१ जण दगावले
कर्नाटकात पुरामुळे भयानक स्थिती निर्माण झालेली आहे, आतापर्यंत कर्नाटकमध्ये ३१ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गृहमंत्री आज बेळगाव दौऱ्यावर आहे.
गुजरात – 31 जणांचा बळी
सुरेंद्रनगर येथे शनिवारी बावडी नदीमध्ये १२ लोक अडकले होते, त्यांच्यापैकी ६ जण पाण्यामध्ये वाहून गेले उरलेल्या सहा लोकांना एन डी आर एफच्या टीमने वाचवले आणि वाहून गेलेल्या सहा जणांचे मृतदेह नदीच्या किनाऱ्यावर सापडले.
महाराष्ट्र – पूरग्रस्तांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत, सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. कोल्हापुरातील शिरोळ गावामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणी भरलेले आहे. एन डी आर एफची टीम ताकदीने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, कोकणासह विदर्भातील काही राज्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. त्यात सांगली, कोल्हापूरची स्थिती भयावह बनली आहे. आतापर्यंत या जिल्ह्यांमध्ये एकूण 27 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळमध्ये बचाव कार्य करणारी बोट उलटून आतापर्यंत 17 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
#Maharashtra: Flood-water receding in Shiroli village, in Kolhapur district, relief operations underway pic.twitter.com/lVrALXOwYp
— ANI (@ANI) August 11, 2019
केरळमध्ये आतापर्यंत 57 जणांचा बळी
८ ऑगस्टरोजी मलप्पुरम जिल्ह्याच्या नीलांबुरच्या कवलप्परा येथे झालेल्या जमीन खचण्याच्या प्रकारामध्ये आतापर्यंत ९ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
Kerala: 9 bodies have been recovered so far in the incident of landslide that occurred at Kavalappara, Nilambur in Malappuram district on August 8.
— ANI (@ANI) August 11, 2019
तसेच केरळमधील रेल्वे सेवा पावसामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली असून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
- Diabetesमध्ये अवश्य करावीत ‘ही’ ५ योगासन, मिळेल उत्तम आरोग्य
- ‘या’ महिलेची फिगर आहे जगातील सर्वात बेस्ट! कसे करते मेंटेन ते जाणून घ्या
- २ महिन्यांच्या बाळालासुध्दा होऊ शकतो ‘डायबिटीज’, जाणुन घ्या ‘हे’ आहेत संकेत
- च्युइंगम चावणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणुन घ्या याचे फायदे
- तोंडाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, असू शकतो कँसर
- तुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, ‘हा’ उपाय करून बघा