धक्कादायक ! शिक्षिकेने केलं चक्क 13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्तीनं लग्न, अन् नंतर…

जालंधर : वृत्तसंस्था – जालंधर येथील एका शिक्षिकेने चक्क १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती लग्न केल्याची एक विचित्र आणि धक्कादायक बाब पुढं आली आहे. तर शिक्षिकेचं लग्न जुळत नसल्याने, शिक्षिकेला वाटत होतं की, असे केल्याने तिचा मंगळ दोष दूर होईल. अशा अंधश्रद्धेमुळे त्या शिक्षिकीने हे कारस्थान केलं आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या कुटुंबाकडून शिक्षिकेविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिक्षिकेने विद्यार्थ्याला ट्यूशनचं आमिष दाखवत दिवसभर आपल्या घरात थांबवल.आणि त्याच्याशी लग्न केलं. मात्र, हे लग्न फक्त सूचक होतं. विद्यार्थ्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी आपल्या घरी ठेवण्याचे सांगितले होते. यासाठी विद्यार्थ्याच्या घरचेही तयार झाले. तरं विद्यार्थ्याला ६ दिवस जबरदस्ती घरात थांबवून ठेवलं आणि जबरदस्ती त्याच्यासोबत लग्न केलं. हळद-मेहंदी आणि मधुचंद्र याचंही नाटक करण्यात आलं. यानंतर पंडितच्या सांगण्यावरून बांगड्या तोडून विधवा होण्याचंही नाटक या शिक्षिकेने केलं आहे. तर एवढंच नाही तर शोकसभाचही आयोजन करण्यात आलं होत. नंतर लग्नाचं कार्यक्रम सर्व झाल्यावर विद्यार्थ्याला घरी सोडण्यात आले.

तसेच. मुलांकडून शिक्षिकेने आणि तिच्या घरच्याने घरातील कामेही करून घेतली. असा आरोप मुलाच्या घरचे करत आहेत. घरी परतल्यावर मुलाने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. हे कळल्यानंतर मुलाच्या घरचे लोक भडकले आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. आरोपी शिक्षिका आणि तिला सल्ला देणारे पंडित पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या परिवाराने तक्रार मागेही घेतली. पण हे प्रकरण जालंधऱचे डीएसपी गुरमीत सिंह यांच्याकडे आहे. अल्पवयीनासोबत लग्न कायद्याने गुन्हा आहे. याबाबत त्यांनी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणावरून आता शिक्षिका आणि तिचा परिवारासह असे कार्य करण्यास भाग पडलेले पंडीतही अडचणीत सापडले आहेत.