महाराष्ट्र : पालघरमध्ये साधुंच्या हत्येप्रकरणात आणखी 19 अटकेत, 5 अल्पवयीनांना पकडले

मुंबई : महाराष्ट्र सीआयडीच्या गुन्हे शाखेने पालघर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात जमावाने दोन साधू आणि त्यांच्या चालकाची बेदम मारहाण करून हत्या केली होती. या प्रकरणात आणखी 19 लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये एका 70 वर्षांच्या ज्येष्ठाचा सुद्धा समावेश आहे. एका अधिकार्‍याने बुधवारी ही माहिती दिली. अधिकार्‍याने सांगितले की, यांच्याशिवाय पोलिसांनी 16 एप्रिलच्या घटनेत पाच अल्पवयींना सुद्धा पकडले आहे.

पोलिसांनुसार, अटक करण्यात आलेल्या लोकांपैकी एक एमटेक डिग्री धारक आणि एक प्रतिष्ठित कंपनीचा व्यवस्थापक आहे. अधिकार्‍याने सांगितले की, आतापर्यंत जमावाच्या हिंसेच्या प्रकरणात 248 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यापैकी 105 जणांना जामीन मिळाला आहे.