बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीडमध्ये पोहचली. यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री व बीडच्या पालकमत्री पंकजा मुंडें आणि खासदार डॉ. प्रीतम मुडें यांनी या यात्रेचे आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात बीड जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळमुक्त करु असा शब्द मराठवाड्यासह बीडच्या जनतेला दिला आहे.
राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा हिशोब देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली आहे. ही यात्रा सोमवारी मराठवाड्यात दाखल झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंची कडा येथे सभा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पाच वर्षामध्ये आम्ही रस्ते, ग्रामीण पायभूत सुविधा दिल्या. पुढील पाच वर्षाच्या काळात मराठवाड्यातील दुष्काळ कायम स्वरुपी नाहीसा करू, यासाठी कोकणातून समुद्राला वाहून जाणेरे पाणी मराठवाड्याकडे वॉटर ग्रिडच्या माध्यमातून वळवू असे आश्वासन देऊन पुन्हा एकदा आशिर्वाद द्या अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
मराठवाड्यात महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्यासोबत पंकजा मुंडें, राम शिंदे, सुरेश धस व जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार पुढील दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वॉटर ग्रिडच्या माध्यमातून पाणी वळवू अशी महत्वाची घोषणा केली आहे.
- दिवसभरात ‘या’ ७ चुकांमधून केली एक चुक, तर होऊ शकतो ‘डायबिटीज’
- तरूणांनो, हँडसम दिसायचेय ? …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ
- झोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम
- गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
- वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण
- रोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण
- दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी
- ‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी
- सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या