मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे सरकार गंभीर नसून मागील चार वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. मराठा समाजाने वारंवार आरक्षणाची मागणी केली. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विविध पद्धतीने मोर्चे काढले. सरकारने सोयीस्कर भूमिका घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ‘सकल मराठा समाजा’ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असून कोणतेही गालबोट न लावता बंद यशस्वी करुया, असे आवाहन मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र याला चाकण अपवाद ठरले. इथूनच हिंसक वळण घेतले. हिंगोलीमध्ये बस पेटून गालबोट लागले. पुण्यात जिल्हा अधिकारी कार्यलयावर दगडफेक केली. तसेच पत्रकाराला सुद्धा धक्काबुक्की झाली. औरंगाबाद मध्ये रस्ते अडविले. रेल्वे मार्ग रोखून ठेवले. नागपूरच्या रेल्वे रुळावर झोपण्याचा प्रयत्न केला.