Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात पुन्हा लागू शकतो लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा
मुंबई – Maharashtra Lockdown | राज्यात लागू कोरोना प्रतिबंधात काही दिवसानंतर शिथिलता आणल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 15 ऑगस्टला, रोजच्या कोरोना व्हायरस प्रकरणांच्या संख्येत वाढ सुरू राहिल्यास लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याचा इशारा दिला आहे.
ठाकरे यांनी मंत्रालयात स्वातंत्र्य दिनाच्या संबोधनात शिथिलतादरम्यान लोकांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले, कारण ऑक्सीजनचा पुरवठा मर्यादित आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आता प्रतिबंधामध्ये शिथिलता आणत आहोत. कोविड अजूनही संपलेला नाही, यासाठी आपल्याला आणखी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मेडिकल ऑक्सीजनची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता, जर प्रकरणांची संख्या वाढली तर आमच्याकडे लॉकडाऊन पुन्हा लावण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही, असे ठाकरे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना राज्य आणि देशाला कोविडमुक्त बनवण्याचा संकल्प करणे आणि पुढील स्वातंत्र्य दिन एका स्वतंत्र वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
राज्य सरकारने मागील आठवड्यात मॉल, जिम, सलून आणि स्पा पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय सामान्य जनतेला 15 ऑगस्टपासून लोकल ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली आहे, मात्र यासाठी दोन्ही डोस घेतलेले असणे आणि 14 दिवस पूर्ण केलेले असण्याची अट घातली आहे.
याशिवाय, राज्यभरातील हॉटेल आणि दुकानांचा कालावधीसुद्धा वाढवला आहे. या दरम्यान
कोविड-19 वरील राज्य टास्क फोर्स 17 ऑगस्टपासून शाळा आणि कॉलेज सुरू करण्याच्या बाजूने
नाही. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी ठाकरे लवकरच टास्क फोर्सच्या सदस्यांना भेटणार
आहेत.
याशिवाय, बृहन्मुंबई महापालिकेने घोषणा केली आहे की, मुंबईत सर्व सार्वजनिक उद्याने, खेळाची
मैदाने, चौपाटी आणि समुद्र किनारे आता सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहतील.
Pune Crime | पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न; हडपसर परिसरातील घटना