Maharashtra MLC Election 2022 | विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना CM उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ संदेश! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 | मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मी चिंता करत बसलो, तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? हारजीत होतच असते. उद्या तर जिंकणारच आहोत. त्याची चिंता नाही, असे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटले. ते शिवसेनेच्या आमदारांशी संवाद साधत होते. उद्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्व आमदारांना मुंबईतल्या वेस्टइन हॉटेलमध्ये बोलावले आहे. याच ठिकाणी ते आमदारांशी बोलत होते. (Maharashtra MLC Election 2022)

 

उद्या 20 जून रोजी विधानपरिषद निवडणुक होत आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून विविध राजकीय पक्षांनी आपआपल्या आमदारांना वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलवर ठेवले आहे. मुंबईतील वेस्टइन हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी संवाद साधताना सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक देखील केले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण देखील सांगितली. (Maharashtra MLC Election 2022)

 

निवडणुकीनंतर चित्र आणखी मोठे

उद्धव ठाकरे म्हणाले, उद्याच्या निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावी लागते. तशी ती ठेवली आहे यालाच लोकशाही म्हणायचं. आपलेच आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही आहे.

 

उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या नंतर हे अजून मोठे चित्र दिसले पाहिजे. एवढ्या संख्येने मला आमदार दिसले पाहिजेत. सभांमधून बरेचसे बोलून झाले आहे. अजूनही बोलण्यासारखे खूप आहे. पण तुमच्यासोबत हा एक दिवस साजरा करावा, असे ठरवले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

बाळासाहेब म्हणाले होते…

बाळासाहेबांची आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण फाटाफुटीचे राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटले, तरी शिवसेना अजून मजबुतीने उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवले आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचे दूध विकणारे नराधम शिवसेनेत नको.

 

आता शिवसेनेत कुणी गद्दार राहिलेला नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मी चिंता करत बसलो, तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? हारजीत होतच असते. उद्या तर जिंकणारच आहोत. त्याची चिंता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत आपले एकही मत फुटलेले नाही. मग फुटले कोणते? तोही अंदाज लागला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. मला फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही.
आता शिवसेनेत असा गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही.

 

आत्ताचे राजकारण हे पावशेर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी टिका केली
तसेच आपल्या आमदारांना एकजुट दाखवण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे.
महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचे आहे.
महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवायचे आहे.
प्रत्येकाला पर्याय असतो. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपाकडे. पण हे किती दिवस चालणार?
आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचे राजकारण हे पावशेर आहे.

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | cm uddhav thackeray to shivsena mla in westin hotel mumbai mlc election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा