ऊस उत्पादकांसाठी खुशखबर ! मोदी सरकार देणार ‘सबसिडी’, थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठक पार पडल्यानंतर कॅबिनेट बैठकीत झालेले निर्णयाबद्दल माहिती दिली. यात सर्वात महत्वाचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला तो म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीवर सबसिडी देण्याचा आणि ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे –
सरकारकडून आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांसबंधित महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यावर एक्सपोर्ट म्हणजेच निर्यात सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात 6 हजार 268 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. प्रकाश जावडेकर म्हणाले की या निर्णयाने साखरेच्या किंमती नियंत्रणात येतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
Union Minister Prakash Javadekar: The Union Cabinet has approved Sugar export policy for evacuation of surplus stocks during sugar season 2019-20; nearly 60 lakh tonnes sugar to be exported in this financial year pic.twitter.com/JeOcy0DTPf
— ANI (@ANI) August 28, 2019
जावडेकर म्हणाले की, अतिरिक्त स्टॉकचा विचार करता शुगर एक्सपोर्ट पॉलिसीला 2019 – 20 च्या सीजनसाठी मंजूरी देण्यात आली आहे, जवळपास 60 लाख टन साखर निर्यात चालू वित्त वर्षात करण्यात येईल. ते म्हणाले की, शुगर एक्सपोर्ट सब्सिडीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
- पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्या असेच ५ फायदे
- किडनी डॅमेज आहे का ? फक्त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्ट करून समजू शकते
- कोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्या याचे ८ फायदे
- सकाळी लिंबूपाणी पिल्याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती
- कँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया
- ‘हे’ आहेत लिव्हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार
- शुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी
- शरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक