नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद शिगेला पोहचला होता. निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवरात्रीनंतर पश्चिम बंगाल भेटीचे आमंत्रण दिले. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते.
Delhi: West Bengal Chief Minister Mamata Banerjee called on Prime Minister Narendra Modi, earlier today. pic.twitter.com/t0GXTaOvsw
— ANI (@ANI) September 18, 2019
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना कुर्ता आणि मिठाई भेट दिली. त्यांनंतर झालेल्या चर्चेदरम्यान बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचे आश्वासन दिल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच त्यांनी राज्यासाठी 13 हजार 500 कोटी रुपयांचा निधीची मागणी केली. तसेच एनआरसी आसाम कराराचा भाग होता. इतर ठिकाणी त्याची तरतूद नव्हती याच्याकडे देखील पंतप्रधानांचे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले.
West Bengal CM Mamata Banerjee in Delhi: The meeting with Prime Minister was good. We discussed changing the name of West Bengal to 'Bangla'. He has promised to do something about the matter. pic.twitter.com/pujLHoooev
— ANI (@ANI) September 18, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट राजकीय नसल्याचे सांगत त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची इच्छा बोलून दाखवली. अमित शहा यांनी वेळ दिल्यास उद्या त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवरात्रीनंतर पश्चिम बंगालमध्ये येण्याचे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कोल ब्लॉकच उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले.
Visit – policenama.com
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा