पोलिओच्या लसीमध्ये व्हायरस आढळल्याने मॅनेजरला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या पोलिओच्या लसीत टाईप -2  व्हायरस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीने महाराष्ट्राला ही लस पुरवली होती. याप्रकरणी मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागातील लहान मुलांना पोलिओच्या लसीकरणासाठी या औषधाचा पुरवठा करण्यात आला होता.  त्यामुळे आतापर्यंत ज्या मुलांना ही पोलीओची लस देण्यात आली त्यांना काही धोका निर्माण झालाय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’27e8c192-c46b-11e8-a4c4-4d583bd4a239′]

गाझियाबादमधील एका कंपनीच्या निष्काळीजपणामुळे देशात पुन्हा पोलिओचा धोका निर्माण झाला आहे. पोलिओमुक्त भारत या संकल्पनेला या कंपनीमुळे सुरुंग लागण्याची शक्यता आहे. कारण गाझियाबादमधील बायोमेड कंपनीद्वारे करण्यात आलेल्या लसींमध्ये टाईप-2 पोलिओ व्हायरस आढळल्याने खळबळ उडाली. या कंपनीच्या व्हायरसयुक्त लसी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वापरण्यात आल्या असून त्यामुळे या दोन्ही राज्यांना अलर्ट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली आहे. पोलिओ अभियानांतर्गत या कंपनीने पुरवलेली लस ७ आॅगस्टला पश्चिमी उत्तरप्रदेशातील भागांमध्ये वापरली गेली. त्यानंतर बनारसमधल्या एका मुलाचा पाय दुखू लागल्याने त्याला हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मुलाच्या शौचाचे नमुने तपासल्यानंतर त्यात टाईप- 2 व्हायरस सापडल्याचे तपासणीत समोर आले़

तुली इंटरनॅशनल हॉटेलच्या पबवर पोलिसांचा छापा

या संपूर्ण प्रकारानंतर कंपनीच्या उत्तर प्रदेशातील प्रयोगशाळांवर छापे टाकून ही औषधे सील करण्यात आली. बायोमेड ही कंपनी इंडोनेशियामधून औषधे मागवून त्यात प्रक्रिया करुन सरकारला पुरवत होती असे समोर येत आहे. कंपनीचे मॅनेजर सरयू प्रकाश गर्ग व इतर अधिकाºयांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला आहे. ड्रग कंट्रोलर आँफ इंडियाच्या माहितीनुसार टाईप 2 व्हायरस हा जीवघेणा नसला तरी ज्या मुलांनी या लसीचे सेवन केले आहे, त्यांच्या मलमूत्रामधून इतरत्र संसर्ग वाढण्याची भीती असते.

[amazon_textlink asin=’B07HCXQZ4P’ text=’ ‘ template=’ProductLink’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3be5a2be-c46b-11e8-adc2-61275986ab27′]

१ एप्रिल २०१६ ला भारत सरकारने आदेश काढून सर्व कंपन्यांना टाईप-२ व्हायरस औषधाची निर्मिती बंद करायला सांगितलं होती. देशातील सर्व कंपन्यांनीच सरकारला ही निर्मिती बंद केल्याचे लेखी कळवलं होतं. खरंतर २०११ पासून भारतात कुठलीच पोलिओ केस न सापडल्याने २७ मे २०१४ रोजी भारत पोलिओमुक्त असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली. अनेक वर्षे त्यासाठी जनजागृतीची मोहीम चालवली गेली. पण आता सात वषार्नंतर एका औषध कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या मोहिमेला गालबोट लागून पुढच्या पिढीवर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे़