Maratha Reservation Protest | जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांची दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार (Video)

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation Protest | जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे समोर आलं आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण (Hunger Strike) सुरु होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज (Jalna Police LathiCharge) केला आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा कण्यात येत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळावर दगडांचा खच पडल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Maratha Reservation Protest)

काय आहे प्रकरण?

29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह इतर दहा जण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला (Maratha Reservation Protest) बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला तर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचे बोललं जात आहे. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार (Jalna Police Firing) करुन लाठीचार्ज केला.

अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे – शरद पवार

पोलिसांच्या लाठीचार्जवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मला जालन्यातून एक दोन लोकांचे फोन आले आणि त्यांनी तिथं काय घडलं ते सांगितलं. मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला. त्या चर्चेत सगळं शांततेत सुरू होतं. मात्र, चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करून त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला.

खरं म्हणजे एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती.
मात्र, हल्ली अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि ते उत्तर न
मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची (Home Minister)
सूचना असावी, असा आरोप शरद पवारांनी केला. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे असून या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडले मत; म्हणाले “या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस…”

PM Narendra Modi | मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार का? यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा त्यांचा अधिकार…”