तनुश्री दत्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी मला कपडे काढून डान्स करायचा आग्रह केला असा आरोप केला होता. विवेक अग्निहोत्री पल्लवी जोशीचे पती आहेत. नुकताच राजकुमार हिराणी यांच्यावरही एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. याबद्दल बोलताना पल्लवी जोशी म्हणाली,’ हिराणींवर आरोप झाले तेव्हा मला धक्काच बसला. आज #MeToo तून होणारे आरोप वाचून खंत वाटते. यातील किती आरोप लैंगिक शोषणाचे आहेत.
उत्तर भारतात महिलांना गावोगावी घरात डांबलं जातं. त्यांचा लैंगिक छळ केला जातो. घरातलेच सदस्य लैंगिक शोषण करतात. पण त्या महिला आपल्या त्रासाबद्दल बोलू शकत नाही. दुसरीकडे कॉर्पोरेटमध्ये एखाद्या पुरुषाने तुम्हाला सुंदर म्हटलं तर महिलांना चालतं. पण त्याने फक्त छातीकडे पाहिलं की ते लैंगिक शोषण कसं काय होऊ शकतं. छातीकडे बघणं योग्य नाही पण त्याला लैंगिक शोषण म्हणता येईल का ? त्यामुळेच मीटूमधून व्यक्त होणाऱ्या महिलांना प्रसिद्धी हवी आहे’