राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ‘खरमरीत’ टिका

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांच्या होणाऱ्या पक्षांतरावर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी जे पेरले तेच उगवले, त्यांनी अनेकांचे पक्ष फोडले आता त्यांच्या डोळ्यादेखत राष्ट्रवादी पक्ष फुटत आहे असे म्हणत त्यांनी थेट शरद पवारांना लक्ष केले.
शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘करावे तसे भरावे’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. जे पवार साहेबांनी पेरले ते उगवले आणि हेच चित्र पवारांना पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या वादाची आठवण करुन दिली. यावर बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे बोलले जाते. त्यावेळी वसंतदादांना किती दु:ख झाले असेल? त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात जे घडत आहे ते फार वेगळे घडतंय असे नाही.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचे आभार

भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगवर भाष्य करताना खोत म्हणाले की, विधानसभेच्या तोंडावर सध्या भाजप पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. जे चांगले लोक आहेत ते ग्रामीण भागाशी जोडलेले आहेत, अशांना भाजपमध्ये काम करण्याची संधी देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीतील जी चांगली मंडळी भाजपमध्ये येत आहे त्यांना मी धन्यावाद देतो.

आरोग्यविषयक वृत्त