काय सांगता ! होय खरंय, चीनमध्येही PM मोदींची ‘क्रेझ’, भारताच्या सरकारवर चीनी नागरिक ‘खुश’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन संबंध ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होत. त्यानंतर भारताने ५९ चीनी ॲप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांना चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं. भारताच्या या आक्रमक धोरणामुळे चीनी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, अशातच चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार चीन नागरिकांमध्ये नरेंद्र मोदींची क्रेझ वाढल्याचं दिसून आलं आहे.

जून महिन्यात भारतीय जवानांवर चीनी सैन्यांनी भ्याडपणे हल्ला केला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशात चीनविरुद्ध संतापाची लाट निर्माण झालेली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचं सांगून, लडाखमध्ये जात भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींची चांगलीच चर्चा सुरु होती. आता, चीनी वृत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात चीनी नागरिकांत मोदींची क्रेझ असल्याचं दिसलं आहे.

सर्वेक्षणानुसार, ५० टक्के नागरिकांनी भारतातील मोदी सरकारचे कौतुक केलं आहे. तर ५० टक्के नागरिक बिजींगच्या बाजूने आपले मत नोंदवत आहेत. तसेच ७० टक्के नागरिकांना भारताची चीनविरुद्ध भावना तीव्र असल्याचं वाटत. त्यातच, ३० टक्के लोकांना दोन्ही देशातील हे संबंध सुधारतील अशी आशा आहे. ९ टक्के लोकांना भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधात सुधार झाला तरी, तो काही काळापुरता असेल असे वाटत. तर, २५ टक्के नागरिकांना वाटत की, दोन्ही देशातील संबंध जास्त काळापर्यंत मजबूत राहतील.

लडाख सीमेवर अद्याप तणाव कायम

१९६२ नंतर लडाखमधील परिस्थिती सर्वात गंभीर बनल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्यापूर्वी रेडीफला मुलाखत देताना आपले मत व्यक्त केलं. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा आमच्या सैनिकांना हौतात्म आलं असून, १९६२ नंतरची सर्वांत गंभीर परिस्थिती ओढावल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. सीमेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आलं आहे.