‘पैशाचं सोंग आणता येत नाही, बळीराजाच्या मदतीसाठी मुंबईत काम सुरू’ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. जे करु शकत नही, ते बोलत नाही आणि जे बोलतो ते करतोच, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमधील (osmanabad) काटगावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी इथे आकडा जाहीर करायला आलेलो नाही, तर तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. या संकटावर आपण नक्की मात करु, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत कास सुरु असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जे करायचाय ते ठोस करु, दसरा-दिवाळीच्या सण तोंडावर आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नाहीत. कोणतंही सोंग करता येत, पैशाचं नाही. केंद्राकडे जीएसटीचे (GST) पैसे थकित आहेत, ते अद्याप आलेले नाहीत. शेतकऱ्यांना शक्य ती, जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असून मुंबईत त्याच काम सुरु आहे. येत्या दोन दिवसांत मदती संदर्भात घोषणा करु, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपली व्हिडीओ क्लीप व्हायरल होतेय, त्यासंदर्भात बोलताना ते म्हणले की , मी ज्यावेळी हे बोललो होतो तेव्हा राज्यात कोविडचं (Corona) संकट नव्हतं. त्यावेळी, केंद्राकडे राज्याची जीएसटीची रक्कम थकलेली नव्हती. तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी असल्याचं ठाकरे यांनी सूचवलं आहे.

राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी भाजप (BJP) नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. मी सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करत नाही. आकडे लावण्यात मला रस नाही. मी जे बोलतो, ते करतो. पण जे करु शकत नाही, ते मी बोलत नाही. त्यामुळे मी उगाच घोषणा करणार नाही. मी इथे आकडे जाहीर करायला आलेलो नाही. तर तुमच्याशी संवाद साधायला, तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यंदाचं वर्ष, संकटाचं आहे. वर्षाची सुरुवात कोरोना महामारीनं झाली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळानं हाहाःकार माजवला. आता परतीच्या पावसाने (Rain) प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आधी कधीही झाला नव्हता इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे अगदी होत्याचं नव्हतं झालं आहे. मात्र आपण या परिस्थितीतूनही सावरू, पण तुम्ही धीर सोडू नका, अशी साद मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना घातली.