अजब प्रेमाची गजब कहानी, Facebook फ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी 3 मुलांच्या आईने केलं 750 KM अंतर पार, नंतर झालं असं काही

बैतुल – मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. येथे एक तीन मुलांची आई फेसबुकवर झालेल्या मित्राशी लग्न करण्यासाठी 750 किमी दूर असलेल्या तरूणाच्या घरापर्यंत पोहचली. जेव्हा तरूणाला शंका आली, आणि जेव्हा त्याने माहिती घेतली तेव्हा समजले की, तो जिच्याशी लग्न करणार आहे, तिचे अगोदरच लग्न झालेले आहे. इतकेच नव्हे, तर ती तीन मुलांची आईसुद्धा आहे.

सोशल मीडियावर झाले प्रेम
फेसबुक फ्रेंडशी लग्न करण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत असतात, परंतु अशाप्रकारचे फ्रॉड कमीच आढळतात. बैतूलच्या हिवरखेडी येथे राहणार्‍या 21 वर्षाच्या तरूणाने सांगितले की, महिलेशी त्याची ओळख फेसबुकवर झाली होती. ज्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फोन आणि व्हिडिओ कॉलवर गप्प होऊ लागल्या. गोष्टी इतक्या पुढे गेल्या की, दोघांचे सोशल मीडियावरच प्रेम झाले.

यूपीहून 750 किमी दूर भोपाळला पोहचली तरूणी
तीन दिवसापूर्वी 9 ऑक्टोबरला तरूणी उत्तरप्रदेशच्या महू येथून 750 किलोमीटरचा प्रवास करून मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आली. जेथे तिने तरूणाला बोलावले आणि तिच्या सोबत बैतूलला जाऊन लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन दिवस टाळल्यानंतर तरूणाने या तरूणीचे आधार कार्ड आणि अन्य आयडी मागितले, जे ती दाखवू शकली नाही. नंतर तरूणाने तिला आधार कार्ड बनवण्याच्या बहाण्याने बैतूलला आणले आणि येथे थेट तिला महिला डेस्ककडे सोपवले. येथे खुलासा झाला की, तरूणीचे वय 25 वर्ष असून ती तीन मुलांची आई आहे.

पतीच्या मारहाणीने होती त्रस्त
महिला सेलचे प्रभारी डीएसपी संतोष पटेल यांनी सांगितले की, तरूणीने आपल्या पतीकडून होणार्‍या मारहाणीमुळे हे पाऊल उचलले. आपल्या मुलांना तरूणीने आई-वडीलांकडे सोडले आणि तरूणाशी लग्न करण्यासाठी ती निघाली. अधिकार्‍याने सांगितले की, तरूणीच्या कुटुंबियांना बोलावले आहे, त्यांच्या ताब्यात तिला देण्यात येईल.