मध्य प्रदेशातील सत्ता संघर्ष : कमलनाथ सरकार बहुमत सिध्द करेल, दिग्विजय सिंहांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील राजकीय उलथापालथ दरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी विधानसभेत कमलनाथ सरकारचे बहुमत सिद्ध करण्याचा विश्वास व्यक्त करत, 22 पैकी 13 बंडखोर आमदारांनी कॉंग्रेस सोडणार नाही असे आश्वासन दिल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यांकडून सिंधिया कॉंग्रेस सोडण्यासारखी पावले उचलू शकतात, हे समजून घेण्याची चूक झाली.

दिग्विजय सिंह म्हणाले, ‘ही चूक आमचीच झाली. आम्ही समजू शकलो नाही कि ते काँग्रेस सोडतील. काँग्रेसने त्यांना काय नाही दिले. चार वेळा खासदार, दोनदा केंद्रीय मंत्री आणि कार्य समितीचे सदस्य बनविले. सिंधिया यांचे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कट तीन महिन्यांपासून सुरू होता आणि कॅबिनेट मंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेमुळे ते भाजपमध्ये दाखल झाले. सिंग पुढे म्हणाले, “जेव्हा त्यांनी गुडगावमधील हॉटेलमधून आपल्या आमदारांना भोपाळला परत आणले तेव्हा सर्व काही सुरू झाले. त्यांनी असेही म्हटले कि, जेव्हा भाजपा नेते कमलनाथ सरकार अस्थिर करण्यात अयशस्वी ठरले तेव्हा अमित शहा यांनी सिंधिया यांना या कामात गुंतवले.

कमलनाथ सरकार टिकेल का, असे विचारले असता सिंह म्हणाले, आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू. आम्ही कोणत्याही वेळी पॉवर टेस्टसाठी सज्ज आहोत.  राजीनामा देणाऱ्या 22 आमदारांच्या संदर्भात ते म्हणाले, ‘हे 22 आमदार कॉंग्रेसचे आहेत. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत. आम्ही गप्प बसलेलो माहित किंवा झोपलेलो नाहीत. 10 आमदार आणि दोन-तीन मंत्री ते कॉंग्रेसपासून वेगळे होणार नसल्याचे सांगत आहेत. सिंधियांना महत्त्व न देण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘कमलनाथ मुख्यमंत्री झाल्यावर सिंधिया यांना उपमुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव होता. परंतु ते म्हणाले की त्यांच्या उमेदवारास उपमुख्यमंत्री करावे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, जर तुम्ही बनलात तर मला काही हरकत नाही परंतु तुमच्या शिष्यांपैकी कोणालाही उपमुख्यमंत्री केले जाणार नाही.

भाजपावर कमलनाथ सरकार अस्थिर केल्याचा आरोप करत सिंह म्हणाले, “भाजप म्हणतो की, ही कॉंग्रेसची अंतर्गत बाब आहे, परंतु आमदारांना चार्टर्ड विमानाने कोण घेऊन गेले?” भाजपचे लोक घेऊन गेले. एवढाच नव्हे तर आमदारांचे राजीनामे भाजपचे माजी मंत्री बंगरुळूवरून घेऊन आले. त्यासाठी भाजपकडून पैशाची तरतूद करण्यात आली आहे. ते म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांना राजीनामा देण्याची विश्वासार्हता पडताळणी करावी लागेल. आमदारांना बोलवून ते राजीनामा देतात की नाही याची पडताळणी केली जाईल. आता विधानसभा अध्यक्ष हे राजीनामे पडताळण्यासाठी बंगळुरुला तर जाणार नाहीत.

सिंधिया यांचे कॉंग्रेसमध्ये परत येणे शक्य आहे का, असे विचारले असता सिंह म्हणाले की, मला यापूर्वी कोणताही आक्षेप नव्हता आणि अजूनही नाही. सिंधियांच्या अनुषंगाने ग्वाल्हेर प्रांतात काम केले गेले आहे आणि त्यांचे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले गेले नाही. ते म्हणाले, ‘ग्वाल्हैर-चंबळ विभागात संपूर्ण कॉंग्रेस तेच चालवत असे. त्यांच्यानुसार संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिली गेली. माझ्या मूळ जिल्ह्यात गुनामध्ये देखील एसपी आणि डीएम पोस्ट यांच्यानुसार होत होते. भिंड-मुरैनामध्ये यांच्यानुसार नेमणुका आहेत. त्यांच्या सहा जणांना मंत्री करण्यात आले. मग काय अडचण होती? ‘