दिल्लीप्रमाणे मुंबईतही ‘दंगल’ घडावी अशी भाजपची ‘मानसिकता’ होती, आव्हाडांचा ‘गंभीर’ आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली आणि मुंबईत राडा झाला म्हणजे देश संपला. दिल्लीत ज्याप्रमाणे दंगली घडल्या त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याने भाजपला ते शक्य झालं नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कर्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणले की, या देशाच राजकारण धर्मद्वेषाच्या माध्यमातून आपल्या ताब्यात ठेवायचं काम भाजप करू पाहतेय, हे दिल्लीच्या दंगलीवरून स्पष्ट होत आहे. दिल्लीच्या दंगलीबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी एकही शब्द काढला नसून हे क्रूरतेची परिसीमा आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी हेच दिल्ली पॅटर्न देशभरात चावणार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
देशात बेरोजगारी वाढली असून आर्थिक घसरण थांबता थांबत नाही. कोणत्याही बाजूने यश मिळत नसल्याने भाजप सरकार आपला चेहरा झाकण्यासाठी जातीय दंगल घडवत आहे. गुजरातमध्ये 2002 ज्या प्रमाणे दंगल घडवण्यात आली होती. तेच मॉडेल आता दिल्लीत पहायला मिळत असल्याचा घणाघाती आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.