‘उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला’ : खा. छत्रपती संभाजीराजे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असलेल्या खासदार संजय राऊत कधीही कोणालाही कात्रीत पकडतात. सध्या राऊत आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद सुरु आहे. यामुळेच छत्रपती संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास सांगितले आहे. मात्र यासाठी राजेंनी राऊत यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसून येते.
भाजपने प्रकाशन केलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राजकीय वर्तुळात चांगलाच वाद उफाळला आहे याच पुस्तकामुळे संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावेळी राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी महाराजांना देखील यामध्ये घेतले होते. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी एक ट्विट केले आहे आणि याद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास सांगितले आहे.
काय म्हणालेत नेमकं छत्रपती संभाजी राजे आपल्या ट्विटमधून :-
“उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.”
उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020
काय म्हणाले होते संजय राऊत
आज के शिवाजी नरेंद्र मोदी, असं महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे महाशय कोण आहेत ? हेच ते जय भगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा !” अशा प्रकारचा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला होता.
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
शिवरायांचया वंशजांनो बोला..
काहीतरी बोला.. pic.twitter.com/FVZEOIkn8v— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
मात्र यावेळी त्यांनी उदयन राजे, शिवेंद्र राजे आणि छत्रपती संभाजी राजे यांना देखील याबाबत जाब विचारला होता. त्यासंदर्भाती ट्विट राऊत यांनी केले होते ज्यामध्ये ते म्हणतात, “सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
शिवरायांच्या वंशजांनो बोला..काहीतरी बोला..”.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- निराश व्यक्तीकडे वेळीच द्या लक्ष, ‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू
- जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम, दोन हात लांबच राहा !
- मोबाईलचे ‘हे’ 7 दुष्परिणाम माहित आहेत का ? जाणून घ्या किती घातक !
- वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- ‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका
- ‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध !
- अळूची पाने आरोग्यासाठी वरदान! ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या