अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अविश्वास ठराव आणलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांची आज दुपारी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर एस. एस. पाटील हे नवीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलून आले आहेत.
माने हे जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे व इतरांना विश्वासात घेत नसल्याने सर्वसाधारण सभेने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून तो एकमताने मंजूर केला होता. माने यांची मुंबई येथे दुरुस्ती व पुनर्बांधणी मंडळात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर सिडकोचे सहकारी संचालक एस. एस. पाटील हे बदलून आले आहेत.
माने यांच्यावरून जिल्ह्यातील राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले होते. माने हे पालकमंत्री राम शिंदे यांचे विश्वासातले होते. विखे यांना जुमानत नसल्यामुळे माने यांच्यावर अविश्वास ठराव आणून विखे यांनी शिंदे यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. दोघांतील अंतर्गत संघर्षातून हा ठराव आणल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. अखेर माने यांची बदली झाल्याने पालकमंत्री शिंदे यांना मोठा धक्का बसला असून, विखे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- ‘या’ पॉइंटवर फक्त ४५ सेंकद करा मसाज, होतील ७ जबरदस्त फायदे ; जाणून घ्या
- ‘या’ ७ वनौषधी करतील मेंदूला ‘तल्लख’, जाणून घ्या कसे करायचे उपाय
- बेली फॅटमुळे हाडे होतात कमुकवत, याकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष ; जाणून घ्या
- स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या ? मेंदूशी संबंधित १० आश्चर्यकारक गोष्टी
- तुम्हालासुध्दा माहिती नसेल, मुलांना ‘या’ ५ कारणांमुळे येतात पिंपल्स ; जाणून घ्या
- सावधान ! ‘या’ रोगांमुळे होऊ शकतो २४ तासांत मृत्यू, जाणून घ्या लक्षणे